Tuesday 22 May 2012

सांगलीकरांच गांधी प्रेम आणि NCERT च कार्टून प्रकरण

महावीर सांगलीकर खरे तर इतके दिवस एक आंबेडकरवादी ,म्हणून लेखन करायचे पण सध्या त्यांना गांधी प्रेमाचा पाझर फुटलाय हे त्याचं लफड उघड होण्यास कारण ठरलं ते NCERT च्या पुस्तकातील बाबासाहेबांच्या बदनामीच नुकताच घडलेलं प्रकरण. सुहास पळशीकर आणि त्याच्या कंपूने जी बाबासाहेबांची बदनामी केली ती जणू कमीच होती म्हणून कि काय महावीर सांगलीकरांनी स्वताला तटस्थ विचारवंत म्हणवून घेण्यासाठी त्या प्रकरणात अस मत नोंदवल कि आंबेडकरवादी गांधीवर अश्लील भाषेत टीका टिप्पणी करतात तेवा त्यांना काही वाटत नाही मग आज बाबासाहेबाची या प्रकरणात जी बदनामी झाली त्याबद्दल कशाला काही वाटून घ्यावयाच? इथे सांगलीकर गांधीला बाबासाहेबांच्या बरोबरीला बसवण्याची खूप मोठी चूक करतात.बाबासाहेब नेहमीच दलितांना म्हणायचे कि गांधी सारख्या कपटी माणसावर विश्वास तुम्ही लोक कसा ठेवता? तसेच रजनीश ओशो म्हणत कि गांधी म्हणजे "the most cunning personality history has ever seen ".महावीर सांगलीकर स्वत एक विचारवंत आहेत आणि इतिहासाच्या संशोधांचा स्वीकार ते नेहमी करतात त्यांनी स्वत सावरकारावर काही संशोधनात्मक लेख लिहून सावरकाराची संघीय चड्डी लोकांसमोर आणली पण गांधीबद्दल जे संशोधनातून सत्य समोर आल तेवा ते स्वताची चड्डी का सावरून घेतात? गांधीवर संशोधन करून लिहिणार्यांना ते कावळ्याची काव काव म्हणतात मंजे त्यांच्या मते सावरकारावर लिहिणारे सर्व पांढरे बगळे आणि तोच न्याय गांधीला लावला तर मात्र गांधीवर लिहिणारे सर्व काळे कावळे?गांधीच महात्म्य सांगण्यासाठी ते नको तो खटाटोप करतात त्यांच्या मते एखादी व्यक्ती किती महान  व लोकप्रिय असते हे मोजण्याचे ४ parometers असतात.१.त्या व्यक्तीवर जगातील किती देशांनी पोस्टाची तिकिटे प्रकाशित केली? २.त्या व्यक्तीवर जगातील किती भाषांमध्ये पुस्तके निघाली? ३.त्या व्यक्तीने मांडलेले जागतिक दर्जाचे लेखक किती प्रमाणात आपल्या पुस्तकात देतात? ४.त्या व्यक्तीवर जगातील किती देशांनी चित्रपट बनवले?ह्या सर्व उच्चभ्रू parometers  मुळे सांगलीकर गांधीला महान ठरवून मोकळे होतात पण ह्याच parometers प्रमाणे एक तरी बहुजन महापुरुष महात्मा ठरतो का? हि सर्व साधने बामानांच्या हातात  आहेत मग ती त्यांचीच कावळे मोठे करणार वरील parometers मध्ये फुले, शाहू,बाबासाहेब,जिजाऊ, शिवराय, अहिल्याबाई,ताराराणी,अण्णाभाऊ,गाडगेबाबा बसतात का महावीरजी? मग आता  ह्या सर्व बहुजन महामानवाना तुम्ही महात्मा मानणार नाही का? भारतातील गांधी घराणे बाहेरील जगाला गांधी म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच गांधी अशी दृष्टी बनवत म्हणून मग ते अजाणतेपणाने गांधीवर पुस्तके,तिकिटे आणि चित्रपटे बनवतात पण अश्याने ती व्यक्ती खूप मोठी असते असे समजण्याइतके  अजाणते तुम्ही तर नाहीत.सामाजिक अंगाने विचार केला तर व्यक्ती किती महान आहे हे मोजण्याचे निकष पुढे आहेत.१.त्या व्यक्तीच्या नावावर देशात किती संघटना,पक्ष कार्यरत आहेत? २.त्या व्यक्तीची जयंती किंवा पुण्यतिथी लोकोत्सव म्हणून साजरी केली जाते.३.त्या व्यक्तीच्या कार्याचा उपयोग म्हणून किती राजकीय पक्ष त्या व्यक्तीला निवडणुकीचा मुद्दा बनवतात?महावीरजी ह्या सर्व निकषामध्ये बहुजनांचे सर्व महापुरुष बस्सतात पण बाम्नांचे भंपक कावळे यात बसत नाहीत.गांधीसुद्धा ह्या निकषात बसत नाहीत पण माझे शिव-फुले-शाहू-आंबेडकर यात बसतात.जर सिनेमे आणि टपाल तिकिटावरून जर महात्मे ठरत असतील तर महाविराजी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सगळ्यात मोठे महात्मे ठरले असते.जर गांधीला लोकांनी स्वीकारलं असत तर सर्व पक्षांच्या प्रचारात गांधीचा फोटो असला असता पण अपक्ष उमेदवार सुद्धा गांधीला विचारात नाही कारण गांधी नावाची सर्वात अश्लील शिवी आहे असे सर्व लोक मानतात.गांधीच्या मागे कुणीच नाही फक्त गांधी घरान आहे जे या देशावर राज करते म्हणून बाहेर देशात त्यांनी गांधीच्या राई एवढ्या  कार्याचा पर्वत करून दाखवला.गांधीनी ब्रीतीशाना लिहिलेलं पत्र हरी नार्केनी प्रसिध्द केल आहे त्यात गांधी इंग्रजांना म्हणतात कि जर तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्यात दलितांना अधिकार असतील तर अस स्वातंत्र्य आम्हाला नको आहे म्हणून सर्व बहुजन समाज असा मानतो कि आमच स्वातंत्र्य नाकारणारा असा वांझोटा महात्मा आम्हाला नको.

महानुभावां​चा परधर्म : हिंदू धर्माशी फारकत!!एक संशोधन.

                    


भारतीय धर्मांचा अभ्यास करताना प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते ती म्हणजे प्रत्येक धर्माचा इतिहास जेवढा उघड आहे त्यापेक्षा जास्त गुपित आणि दुर्लक्षित आहे.महानुभाव आणि त्यांचा धर्म पण याला अपवाद नाही.महानुभाव या शब्दाचा अर्थ होतो ज्या व्यक्तीला महान अनुभव आहे असा तो.महानुभाव हा धर्म नसून धर्माच्या प्रसारकांना दिलेली ओळख आहे.जसे वैदिक धर्माचे प्रसारक भट या नावाने ओळखले जातात,जसे बुद्ध धम्माचे प्रसारक भिक्कू या नावाने ओळखले जातात किंवा इस्लाम धर्माचे प्रसारक मुल्ला-मौलवी या नावाने ओळखले जातात तसेच महानुभाव हे "परधर्म" नावाच्या धर्माचे प्रसारक आहेत.परधर्म नावाचा स्वतंत्र धर्म महात्मा चक्रधराने इसवि सन १२६७ मध्ये महाराष्ट्रात स्थापन केला.महावीर जैन,तथागत बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर नंतर चौथा धर्म संस्थापक होण्याचा मान महात्मा चक्रधराला जातो.नावावरूनच प्रस्थापित धर्म व्यवस्थेशी घेतलेली फारकत जाणवणारा हा परधर्म आज बहुजनांच्या अज्ञानीपनामुळे वैदिक धर्माचा एक पंथ "महानुभाव पंथ" म्हणून उरला आहे.सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे कि महानुभाव हा धर्म नाही तर ती धर्मप्रसारकची ओळख आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहुजन महानुभावांचा धर्म हा वैदिक(हिंदू) धर्माचा पंथ नाही.जो धारणा करतो तो धर्म अशी धर्माची व्याख्या पुराणात आहे मग जर धारणा करणारा धर्म असेल तर मग वैदिक(हिंदू) धर्म तर बहुजन महानुभावांची कुठलीच धारणा करत नाही मग असा वैदिक(हिंदू) धर्म महानुभावांचा धर्म कसा असू शकेल?धर्माची दुसरी व्याख्या पाश्चिमात्य विचारवंत थिओडोर पार्कर अशी करतो कि धर्म म्हणजे केवळ सिद्धांत नसून जीवनप्रणाली आहे.मग वैदिक(हिंदू) धर्मातील कुठलाच  सिद्धांत बहुजन महानुभावांची जीवनप्रणाली नमूद करत नाही मग असा वैदिक(हिंदू) धर्म महानुभावांचा धर्म कसा असू शकेल?महानुभावांचा वैदिक धर्मापासून वेगळा असा स्वतंत्र परधर्म नावाचा धर्म होता याचा पुरावा चक्रधराच्या सुत्रापाठात आहे.चक्रधर सुत्रापाठात उमाइसा नावच्या शिष्यीनीला धर्माचे महत्व सांगताना म्हणतात कि "परधर्म तुमचे जीवन कि गा".चक्रधर सूत्रपाठात कधीच महानुभाव पंथ म्हणून उल्लेख करत नाहीत.ते नेहमी परधर्म हाच उल्लेख करतात.

महानुभाव हे परधर्माचे प्रसारक होते आणि महानुभावांचा परधर्म हा वैदिक(हिंदू) धर्माहून वेगळा धर्म होता हे सिध्द करणारा ऐतिहासिक पुरावा म्हणजे जिझिया करावीषयी औरंगजेबाने काढलेले फर्मान.औरंगजेबाने त्याच्या राजवटीत जिझिया नावाचा कर लादला होता.हा कर फक्त हिंदू धर्मियांवर लादला गेला होता जे जे हिंदू सोडून इतर धर्मीय होते त्यांना या करापासून मुक्ती दिली गेली होती. औरंगजेबाचे त्या कराचे फर्मान आज हि उपलब्ध आहे त्यात असा स्पष्ट उल्लेख आहे कि महानुभावांवर जिझिया कर लादू नये.यावरून हे सिध्द होते कि परधर्मीय महानुभाव हे वैदिक(हिंदू) नव्हते आणि नाहीत त्यांचा एक स्वतंत्र धर्म आहे.
महानुभाव वैदिक(हिंदू) नसल्याचा तिसरा ऐतिहासिक पुरावा म्हणजे महानुभावांच्या पेशावायीत केलेल्या कत्तली.भारतीय इतिहासात हिंदू धर्मापासून वेगळे होऊन जातीयता आणि विषमतेवर प्रहार करणाऱ्या धर्मावर आणि त्यांच्या प्रसारकांवर वैदिक ब्राम्हणांनी प्राणघातक हल्ले केलेले आहेत.बुद्ध धर्म हिंदुधर्मापासून वेगळा होऊन सर्वमान्यता प्राप्त करत होता तेव्हा पुष्यशंग मित्र नावाच्या ब्राम्हणाने एका बौध भिक्कुच्या डोक्यावर एकलक्ष सोन्याच्या मोहरा बक्षीस ठेऊन भिक्कुंच्या कत्तली घडवून आणल्या कारण बुद्ध धर्म हा हिंदू धर्मापासून वेगळा होऊन ब्राम्हणांना आव्हान करत होता.तसेच काम परधर्म प्रसारक महानुभाव वैदिक(हिंदू) धर्मापासून वेगळे होऊन करत होते म्हणून पेशावायीच्या कालखंडात महानुभावांच्या प्रचंड प्रमाणात कत्तली झाल्या.महानुभावांचे साहित्य जाळण्यात आले नानासाहेब पेशव्याने तर महानुभवाना  वाळीत टाकण्याचे फर्मान काढले होते.पेशवे दफ्तर संशोधनानंतर हि बाब उघडकीस आली आणि याचा फर्मान रुपी पुरावा हि सापडला.यावरून हेच सिध्द होते कि जसे बुद्ध वैदिक(हिंदू) धर्मापासून वेगळे होऊन स्वत:च अस्तित्व निर्माण करत होते तसेच अस्तित्व परधर्मीय महानुभाव हिंदुपासून वेगळे होऊन करत होते म्हणूनच भिक्कुप्रमानेच महानुभावांच्या मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्या.महानुभाव हिंदू धर्मापासून वेगळे असल्याचा आणखी महत्वाचा पुरावा म्हणजे ब्राम्हणरत्न लोक-अमान्य टिळकाची साक्ष.महानुभावांच्या एका बदनामीच्या प्रकरणात टिळकाणे अभ्यासअंती कोर्टात अशी साक्ष दिली होती कि महानुभाव हे वैदिक(हिंदू) नाहीत.म्हणजे महानुभावांचा हिंदुपासून वेगळा झालेला एक स्वतंत्र धर्म आहे हे टिळकाच्या काळापर्यंत सर्वश्रुत होते.महानुभावांचे रिती,रिवाज,उपासना,दैवत हे सर्व वैदिक(हिंदू) पेक्षा वेगळे निर्माण केलेले होत म्हणूनच ब्राम्हण त्यांना अर्ध-बाटगे मुसलमान म्हणून हिणवत असत.

चक्रधराच्या नंतर अनुयायांच्या भोलेपनामुळे ब्राम्हणांनी हा धर्म स्वता:च्या ताब्यात घेतला.परधर्म हे नाव नामशेष करण्यासाठी ब्राम्हणांनी महानुभाव या नावाचा प्रचार आणि प्रसार केला.परधर्म नावामुळे बहुजन जागृत होतील इतिहासाचा अभ्यास करून वैदिक(हिंदू) धर्माच्या पेकाटात लाथा घालून ब्राम्हणांना नामशेष करतील म्हणून ब्राम्हणांनी परधर्मीय ओळख पुसण्यासाठी परधर्मीय बहुजनांचे महानुभाविकरण सुरु केले.पण परधर्मीय असलेल्या बहुजनांचे महानुभाविकरण हे महानुभाविकरण नसून ब्राम्हणीकरणच आहे हे समजण्याची अक्कल सुजाण बहुजानात नाही हि एक शोकांतिका आहे......जय जिजाऊ.....जय शिवराय

                                         -शिवश्री प्रदीप इंगोले
                                          जिजापूर(पुणे)९७६६५७५४७९.